शरद पवारांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल ; राज ठाकरेंना गांभीर्यानं घ्यायची गरज नाही

0
199

मुंबई : काळ ठाण्यात मनसेची उत्तरसभा मोठ्या थाटात पार पडली. या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली. आज मुंबई येथे पत्रकार परिषद घेत शरद पवारांनी राज ठाकरेंना प्रतिउत्तर दिले आहे. काही दिवसांपूर्वीच मी अमरावतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल २५ मिनिटं भाषण केल्याचा दाखला पवारांनी दिला.शिवाजी महाराजांचं नाव घेत नाही, याबाबत पवार म्हणाले की, राज ठाकरेंनी माझं अमरावतीचं भाषण ऐकावं, २ दिवसांपुर्वीच्या माझ्या भाषणांत मी शिवरायांचा उल्लेख केला आहे असं स्पष्टीकरण पवारांनी दिलं आहे.

पवार पुढे म्हणाले, फुले, आंबेडकर आणि शाहुंचा उल्लेख केला जातो त्याचा मला अभिमान आहे. या राज्यामध्ये शिवछत्रपतींच्या चरित्र सविस्तरपणे कोणी लिहिलं असेल तर फुलेंनी लिहिलं आहे. महाराजांचा कसा आदर्श घेऊन कशाप्रकारे करावा हे या तिघांनी मांडलं आहे, असं पवार म्हणालेत. तसेच पुढे बोलताना शरद पवार यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्या लिखाणावर आपण आक्षेप घेतल्याचा अभिमान असल्याचं म्हटलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यक्तीमत्व घडवण्यामध्ये माँ साहेब जिजाऊंचा वाटा होता. मात्र पुरंदरेंनी तसं लिखाण केलं नाही. या लिखाणाला मी उघडपणे विरोध केला त्याचा मला अभिमान आहे. त्यांनीही कधी यासंदर्भात खुलासा केला नाही, असं पवारांनी म्हटलं आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार म्हणाले की, “राज ठाकरे वर्षा-सहा महिन्यात एखादं स्टेटमेंट करतात. त्यामुळे त्यांना फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही. ते म्हणतात की, मी कधीच शिवाजी महाराजांचे नाव घेत नाही.पण, दोन दिवसांपूर्वी मी अमरावतीमध्ये गेलो होतो. तुम्ही माझे अमरावीतचे भाषण ऐकू शकता. मी त्यात शिवाजी महाराजांचे योगदान, यावर पंचवीस मिनीटे बोललो. या राज्यात शिवछत्रपतींचे सविस्तर वृत्त काव्यांच्या माध्यमातून महात्मा फुलेंनी सर्वात आधी लिहीले. शाहू, फुले, आंबेडकर यांना महाराजांबद्दल खूप आस्था होती.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here