महाविकास आघाडी सरकारला झटका; महत्वपूर्ण पक्ष सरकारमधून बाहेर

0
195

द पॉईंट नाऊ ब्युरो : महाविकास आघाडीला मोठा झटका बसला आहे. महाविकास आघाडीचा भाग असलेला स्वाभिमानी शेतकरी संघटना हा पक्ष महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडला आहे.

राजू शेट्टी यांचा स्वाभिमानी शेतकरी संघटना हा पक्ष सरकारमधून बाहेर पडला आहे. याबाबत राजू शेट्टी यांनी कोल्हापूर येथे घोषणा केली. महाविकास आघाडीचा भाग असलेला स्वाभिमानी शेतकरी संघटना या पक्षात खदखद सुरू असल्याची चर्चा होती. हा पक्ष सरकारमधून बाहेर पडेल अशी चर्चा होती, ती आज खरी ठरली.

राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी सरकारद्वारे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले जात नसल्याची नाराजी राजू शेट्टी यांनी बऱ्याच वेळा व्यक्त केली होती. त्याचा परिणाम आज दिसून आला. अखेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महाविकास आघाडी सरकारला सोडचिट्ठी दिली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here