द पॉईंट नाऊ ब्युरो : महाराष्ट्रातील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापलेले आहे. भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांनी जातीयवाद निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.
महाराष्ट्रात सध्या भाजप विरुद्ध महाविकास आघाडी सरकार मधील घटक असे युद्ध रंगलेले दिसते आहे. एकमेकांवर गंभीर आरोप केले जात आहे. नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस नेते नवाब मलिक यांच्या अटकेनंतर वातावरण अजून तापले आहे.
यादरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर आरोप करत, समाजात जातीयवाद निर्माण करण्याचे प्रयत्न शरद पवार करतात. कधी ते मराठा विरुद्ध नॉन मराठा आणि कधी अल्पसंख्यांक विरुद्ध नॉन अल्पसंख्यांक असा वाद सुरू करतात असे म्हटले आहे. यामुळे भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असे वाकयुद्ध अजून रंगण्याची चिन्हे आहेत. आता चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस सर्वेसर्वा शरद पवार किंवा राष्ट्रवादी नेते काय उत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम