मुंबई प्रतिनिधी : शिवसेना भाजपा संघर्ष शिगेला असून नुकतेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काही वेळापूर्वी एक ट्विट (Tweet) केले असून राज्याच्या राजकारणात पुन्हा खळबळ उडवून दिली आहे, या ट्विटद्वारे त्यांनी थेट मातोश्रीवरील (Matoshri) चौघांना इशारा देत सेनेला अंगावर घेतले आहे. या ट्विटनंतर पुन्हा सेना भाजपा आमने सामने येण्याची शक्यता वाढली आहे.
मातोश्रीवरील चौघांसाठी ईडीची नोटीस तयार आहे. व सुशांतसिंह राजपूत प्रकरणाची फाईलही पुन्हा ओपन होणार असल्याचा दावा राणे यांनी केला आहे यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
राणे यांनी म्हणाले की, खासदार विनायक राऊत यांच्यासाठी खास बातमी आहे. पुन्हा सुशांतसिंह व दिशा सालियन (Disha Salian) या दोघांचीही आत्महत्या नव्हे हत्या झाली त्यांचीही चौकशी परत होईल, एवढेच नाही तर मातोश्रीच्या चौघांवर ईडीची नोटीस तयार असल्याची माहिती समजली असे देखील राणे म्हणाले.
त्यांच्या हा ट्विटनंतर पुन्हा खळबळ उडाली आहे, मातोश्री वरील ते तिघे कोण हा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे. अनेकांनी तर्क वितर्क लावण्यास सुरुवात केली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम