द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : सकाळ पासून राणेंना अटक होण्याच्या चर्चा होत आहेत. मात्र आता तो क्षण जवळ आल्याचे चियर आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणेंना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते अशी माहिती समोर येत आहे. नुकत्याच प्राप्त झालेल्या माहितीनुसार नाशिक पोलिसांचे पथक रत्नागिरीच्या वेशीवर पोहचले असून थोड्याच वेळात ते रत्नागिरी गाठणार आहेत. त्यामुळे कुठल्याही क्षणी राणेंना अटक होण्याची शक्यता वर्तविली जाते आहे.
दरम्यान, नाशिक पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर एक पथक रात्रीच राणेंच्या अटकेसाठी रवाना झाले आहे. नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांच्यावर राजकीय स्तरातून टीका होत असून पोलीस स्वत:ला छत्रपती समजतात का असा सवाल माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी विचारला आहे. यामुळे पोलिसांवर देखील टीका करण्यात बीजेपी मागे राहिलेली नाही.
आज रत्नागिरीत माध्यमांशी बोलताना मंत्री राणे म्हणाले की, पोलीस आयुक्त हे राष्ट्रपती आहेत का कारवाई करायला. त्यांना कायदा माहिती आहे का असाही सवाल राणेंनी केला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम