द पॉईंट नाऊ ब्युरो : आमचे सरकार आल्यास, शेतकऱ्यांचे कर्ज 10 दिवसांत माफ केले जाईल. या प्रमुख घोषानेसह काँग्रेसने उत्तर प्रदेश येथे आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला.
उत्तर प्रदेशात निवडणुकांचे रंग भरले गेले आहेत. यात प्रमुख लढत ही मुख्यत्वे भाजप, समाजवादी पार्टी मध्येच दिसून येत आहे. त्यात काँग्रेस पक्षाने देखील यावेळो उत्तर प्रदेश निवडणुकीकडे विशेष लक्ष दिलेले आहे. काँग्रेसने ‘उन्नती विधान जन घोषणा पत्र – 2022’ नावाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे. यात काँग्रेसने कर्जमाफीसह 20 लाख लोकांना रोजगार, वीजबिल निम्मे करण्याचे आणि कोरोना काळातील थकबाकी माफ करण्याचे जाहीरनाम्यात म्हटले आहे.
दरम्यान, तृणमूल काँग्रेसने समाजवादी पक्षाला इथे पाठिंबा दिलेला आहे. काँग्रेसने देखील मतांची वाटणी न होऊ देता, समाजवादी पक्षाला पाठिंबा द्यावा असे सांगितले होते. मात्र काँग्रेसने यास काहीही प्रतिसाद न दिल्याचे ममता बॅनर्जी म्हटले आहे.
आता काँग्रेसच्या या जाहिरनाम्यानंतर या निवडणुकीत त्यांच्या हातात काय आणि किती पडणार हे लवकरच स्पष्ट होईल.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम