संगमनेर प्रतिनिधी : जनतेने नाकारलेले सत्तेसाठी एकत्र आलेत. त्यांना विकासाचे धोरण माहिती नाही, त्यांच्याकडे आराखडा नाही. राज्यावरील अस्मानी व महाविकास आघाडी सरकारच्या सुलतानी संकटात सर्वसामान्य जनता भरडली जात आहे. विकासाचे मुद्दे व धोरण नसल्याने, मंत्री काहीही बोलत नाहीत. मंत्र्यांमध्ये बोलण्याची हिम्मत नाही. संजय राऊत व नाना पटोले नुसतीच टिवटिव करतात,त्यांचं बोलन मनावर घ्यायचं नसत , अशी टीका भाजपाचे प्रदेश सरचिटणीस व माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आघाडी सरकारवर केली आहे.
प्रशासनावर पकड नाही….
आघाडी सरकारमध्ये सहभागी असलेल्या तीनही पक्षांच्या नेत्यांमध्ये एकवाक्यता नाही प्रशासनावर सरकारची पकड अजिबात नाही. त्यामुळे राज्याची २५ वर्ष पिछेहाट झाली आहे, असा टोला त्यांनी लगावला. भाजपाचे युवा मोर्चा तर्फे राज्यभरात संघटन मजबुतीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील तसेच माजी मंत्री बावनकुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतांना बोलत होते.
नाकर्ते सरकारने आरक्षण घालवले…
मराठा आरक्षण व ओबीसी आरक्षण या क्रमदरिद्री सरकारने घालवले, दोष मात्र केंद्र सरकारला देतात. महाराष्ट्रात पावसामुळे विविध भागात नुकसान झाले. सरकार मात्र अपयशी ठरत आहे, मंत्री मात्र एकही बोलत नाही सरकार आहे की नाही हा प्रश्न उपस्थित होतो असे म्हणत बावनकुळे यांनी सरकार विरोधात त्रागा केला. या वेळी भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सचिन तांबे, उत्तर नगर जिल्हाध्यक्ष ॲड. श्रीराज डेरे, उपाध्यक्ष कल्पेश पोगुल, योगराजसिंग परदेशी, जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर गुंजाळ, राजेंद्र सांगळे, संगमनेर तालुकाध्यक्ष डॉ. अशोक इथापे, दिनेश सोमाणी, जगन्नाथ शिंदे, अरुण शिंदे, सुमित राऊत, केशव दवंगे, विनायक भोईर, सोमनाथ बोरसे उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम