ग्रामपंचायत सदस्यांची तुफान हाणामारी ; महिला वर्ग आघाडीवर

1
33

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : अहमदनगर जिल्ह्याच्या दरेवाडी येथे ग्रामपंचायत पदाधिकारी वर्गातच हाणामारीची घटना घडली.

राजकीय वादंग हा प्रकार तसा काही लोकांसाठी नवीन नाही. टीका टिप्पणी, हमरी तुमरी, आरोप प्रत्यारोप अशा गोष्टी राजकीय वर्तुळात घडतच असतात. हाणामारीची बाब देखील राजकीय गोटात काही नवीन नाही.

अहमदनगर तालुक्याच्या दरेवाडी येथे राजकीय वादातून ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांमध्येच तुफान हाणामारी झाली. हे प्रकरण पोलीस ठाण्यात जाऊन पोहोचलं. मात्र हाणामारी करणाऱ्यांचं पोट भरलं नसेल की काय, म्हणून ते थेट पोलीस ठाण्याच्या आवारात देखील एकमेकांना भिडले.

मुख्य म्हणजे या वाद घालणाऱ्यांमध्ये, महिला देखील होत्या. ज्यांच्या मुखातून अतिशय घाणेरड्या प्रकारच्या शब्दांचे उच्चार बाहेर पडत होते. या वादात शिवीगाळ करण्यात तर महिला देखील मागे नव्हत्या. त्यामुळे हे प्रकरण चांगलंच चिघळलं होतं.

लोकप्रतिनिधी म्हणजे लोकांचं प्रतिनिधित्व करणारे. आणि लोकांसमोर आदर्श ठेवणं हे यांचं कर्तव्य. मात्र इथे दरेवाडीच्या ग्रामपंचायत सदस्यांनी वेगळाच आदर्श लोकांसमोर ठेवला.

दरेवाडी इथल्या या ग्रामपंचायत सदस्यांमधील हाणामारीच्या घटनेप्रकरणी दरेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच , शिवसेना तसेच भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता यांच्यावर काय कारवाई होते? की राजकीय मंडळी म्हणून सारं वरवरचं निभावून नेलं जातं? याकडे सर्वांचे लक्ष आहे.

 

ही बातमी वाचलीत का?

मागील बऱ्याच कालावधी पासून सुरू असलेल्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील 100 कोटींचे वसुली आरोप प्रकरणात आता नवीनच खुलासा झाला आहे.

अटकेत असलेले निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी एक नवीनच खुलासा केल्याने, आता हे प्रकरण नव्या वळणावर पोहोचणार असे दिसत आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कोणतीही 100 कोटींची वसुली करायला सांगितली नव्हती. तसेच मी कोणाकडूनही पैसे घेतले नाहीत. असे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी चांदीवाल आयोगासमोर सांगितले आहे.

सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर मुंबई चे निलंबित पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महिन्याला 100 कोटींच्या वसुलीचे टार्गेट दिल्याचा लेटर बॉम्ब फोडला होता. ज्यामुळे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला. आणि जे सध्या अटकेत आहेत. हे आरोप केल्या नंतर परमबीर सिंह गायब झाले होते.

अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

‘अनिल देशमुखांनी 100 कोटींची वसुली सांगितलीच नाही’


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here