पार्डी मोड ते कोंढुर रस्त्यासाठी मनसे करणार रास्ता रोको

0
44

हिंगोली (Nagesh Patange) ; पार्डी मोड (Pardee Mod) ते कोंढुर – दिग्रस (Kondhur – Digras)  रस्त्याच्या (Road) मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे (Maharashtra Navnirman Sena)  2 डिसेंबर रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.

रस्ता हा रहदारी साठीचा अतिशय महत्वाचा भाग आहे. मात्र हिंगोली (Hi goli) मधल्या या महत्त्वाच्या रस्त्याची खूप दुरवस्था झाली आहे.

त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (Maharastra Navnirman Sena) 2 डिसेंबर रोजी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

चिचोर्डी (Chichordi), पारडी (Paradi) , कोंढुर, डिग्रस आदींसह अनेक गावांना जोडणारा हा महत्वाचा रस्ता (Road) आहे. मात्र याच महत्वपूर्ण रस्त्याची दुरवस्था झालेली असतांना लोकप्रतिनीधी मात्र लक्ष द्यायला तयार नाहीत.

प्रशासनाच्या दुर्लक्षित पणामुळे हा रस्ता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाला जागे करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हिंगोली – नांदेड (Hingoli – Nanded) रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करणार आहे.

या रास्ता रोको आंदोलनासाठी सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (Maharashtra Navnirman Sena) पदाधिकारी, कार्यकर्ते, गावकऱ्यांना (Villagers) उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा उपाध्यक्ष विनोद बांगर (Vinod Bangar),  कळमनुरी तालुका अध्यक्ष विठ्ठल देशमुख (Vitthal Deshmukh)यांनी केले आहे.

ही बातमी वाचलीत का?

सटाणा (Satana) शहरातील (City) विविध भागात आदिवासी बांधव अनधिकृतपणे झोपड्या उभारुण रहिवास करीत आहेत. अशा रहिवास करणाऱ्या अदिवाशी बांधवांना नगरपालिका प्रशासनाने हक्काची जागा देऊन शासनाच्या माध्यमातून घरकुले करून द्यावीत या मागणीसाठी शहरातून मोर्चा काढत पोलिस (Police)  परेड मैदानावर आमरण उपोषणाला प्रारंभ केला असुन, या मोर्चाचे नेतृत्व भारतीय जनता पार्टीने (BJP)  केले.

सटाणा शहरातील सुकड नाला, बस स्थानक पाठीमागील इंद्रप्रस्थ कॉलनी, चौगाव बर्डी, आराई पांधी या परिसरात आदिवासी बांधव गेल्या अनेक वर्षांपासून अनधिकृतपणे झोपड्या बांधून रहिवास करीत आहेत. नगर पालिकेने हक्काचे घरे मिळवून देतो या नावाखाली प्रत्येक झोपडी धारकांकडून ३०० रूपये वसूली केली असतांना ही त्यांना अद्यापपर्यंत हक्काची घरे मिळालेली नाहीत. पालिकेने घरे बांधून द्यावीत सर्व सुख सुविधा उपलब्ध करून द्याव्यात या मागणीसाठी संतप्त आदिवासी बांधवांनी सोमवार (ता.२९)रोजी यशवंतराव महाराज मंदीरापासून शिवतीर्थ, विंचूर प्रकाशा महामार्ग, तहसिलदार कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी मोर्चेकऱ्यांनी हक्काची घरे बांधून द्या, नागरी सुविधा पुरवा, अशा घोषणा दिल्यात.

पुढील माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

आदिवासींना हक्काची जागा द्यावी यासाठी सटाणा शहरात भाजपा मैदानात


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here