Uddhav Thackeray | शिंदेंनी ठाकरेंना घेरलं; २५ वर्षाच्या कारभाराचे होणार ऑडिट

0
65
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray

Uddhav Thackeray | महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सर्वच मोठी चढाओढ सुरू असून, सर्वच पक्षांचे नेते हे आगामी निवडणुकांच्या तोंडावर एकमेकांचे पाय ओढण्यात आणि एकमेकांना आरसा दाखवण्यात व्यस्त आहेत . दरम्यान, यातही शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट हा सामना सध्या जोरदार रंगलेला असून, ह्या नेत्यांनी टीकेची पातळीच ओलांडली आहे.

दरम्यान, आता थेट मीडियासमोर शिवीगाळ देखील सर्रासपणे केली जात आहे. यातच आता शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत वाढ करण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्याकडून राजकीय गुगली टाकण्यात आली आहे. त्यानुसार, मुंबई महानगर पालिकेच्या २५ वर्षांच्या कामांचे ऑडीट केले जात असून, ह्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत वाढ केली जात आहे.

 दरम्यान, या प्रकरणी राज्य सरकारतर्फे मुंबई महानगर पालिकेच्या मागील २५ वर्षांच्या सर्व कारभाराची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. तसेच मुंबई मनपाच्या कारभाराची श्वेतपत्रिका देखील काढण्याचा देखील निर्णय घेतला असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. दरम्यान, राज्य सरकारच्या ह्या निर्णयामुळे शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अडचणी वाढणार आहेत.

Nashik | शिंदे कमळाबाईची पालखी वाहण्यासाठी गेले; अंधारेंची नाशकात तूफान बॅटिंग

आता शिंदे सरकारच्या ह्या निर्णयानंतर ठाकरे गटही संतप्त झाला असून, “हिंमत असेल तर मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका घेऊनच दाखवा, मुंबईची जनताच तुमच्या कामांचे ऑडिट करेल, असा हल्ला ठाकरे गटाच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, ठाकरे गटाच्या ह्या प्रश्नाला शिंदे गटाकडून शिक्षणमंत्री मंत्री दीपक केसरकर यांनी उत्तर दिले आहे. यामुळे आता मुंबई महापालिकेवरुन शिंदे गट विरुद्ध ठाकरे गटात पुन्हा जुंपली आहे.

इतक्या मिर्च्या का झोंबल्या

कोरोना काळात मुंबई महापालिकेत झालेला गैरव्यवहार समोर आलेला असून, तसेच इतरही अनेक गैरव्यवहारांचे गंभीर आरोप केले जात आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या सर्वच कारभाराची चौकशी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तसेच मुंबई पालिकेच्या सर्व आर्थिक व्यवहारांचे ऑडिट केले जाणार आहेत. त्यासाठी श्वेतपत्रिकादेखील काढणार असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले आहे.

Sanjay Raut | “संजय राऊत चुXX झालाय”; राज्यात पुन्हा शिव्यांचे राजकारण

दरम्यान, त्यानंतर विरोधकांनी पुणे, ठाणे, नागपूर तसेच इतरही शहरांतील मनपाच्या चौकशीची मागणी केली असून, यावर बोलताना, “मुंबई पालिकेच्या ऑडिटचे आदेश देताच यांना इतक्या मिर्च्या का झोंबल्या. कोविड सेंटरमधील घोटाळेही सर्वांसमोर आलेत. मुंबईच्या नंतर ज्या ज्या ठिकाणी आरोप होतील, त्या सर्व पालिकांची चौकशी होईल. तुम्ही स्वच्छ असाल तर, तुम्हाला घाबरण्याची गरजच काय आहे? अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here