माहिती अधिकारामार्फत आसाराम डोंगरे यांनी जालन्यातील लाठीचार्जचे हे आदेश कोणी दिले होते. याची माहिती मागितली होती. त्यावर जालन्याचे पोलीस उपअधिक्षक आर.सी. शेख यांनी ही माहिती दिली आहे. मराठा आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज करण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आदेश आलेले नव्हते. असं त्यांनी त्यात म्हटलेलं आहे.
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावात मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या उपोषणस्थळी २३ ऑगस्ट रोजी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आलेला होता. त्यानंतर त्याच्याविरोधात संपूर्ण राज्यभरातून तीव्र निषेध व्यक्त केला गेला. पोलिसांच्या ह्या लाठीचार्जनंतर त्यावेळी तेथील पोलिसांवर तसेच अनेक बसेसवर ठिकठिकाणी जोरदार दगडफेक करण्यात आली होती.
जालन्यातील मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्याचे आदेश हे कुणी दिलेले होते. असा विरोधकांनीही प्रश्न केला होता. दरम्यान, या घटनेनंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलगिरी व्यक्त केली व तसा आदेश गृहमंत्रालयाकडून दिला गेलेला नव्हता. असेही त्यांनी स्पष्ट केलं होतं. तरीही जालन्यातील घटनेवरून विरोधकांसह अनेकांनी फडणवीस यांच्यावर आरोप केले होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम