Big News | नोकरीची वाट पाहणाऱ्या लाखो तरुणांना राज्य सरकार दिलासा देणार आहे. नव्या योजनेनुसार मुलाखतीनंतर लगेच नोकरी मिळणार आहे. त्यासाठी राज्य शासनाने एक नविन योजना तयार केली आहे. नागपूर शहरातून या योजनेची अंमलबजावणी होणार आहे. 09 आणि 10 डिसेंबर रोजी यासाठी राज्यस्तरीय मेळावा होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी पुढाकार घेतलेला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील अनेक ठिकाणी या पद्धतीने मेळावे घेऊन खासगी कंपन्यांमध्ये सरकारमार्फत भरती करण्यात येणार आहे. यामुळे एकीकडे आरक्षणासाठी राज्यातील वातावरण तापले असताना राज्यशासनाने शासकीय प्रमाणे खासगी कंपन्यांमध्ये भरती सुरु करण्यासाठी पावले उचललेली आहे.
मालेगावातील अवैध कत्तलखाने तात्काळ तोडण्यात यावे; निखिल पवारांची पालकमंत्र्यांकडे मागणी
सरकारी पदे भरण्याची नविन प्रक्रिया
राज्य शासनात लाखो पदे रिक्त आहे. त्यातील 75 हजार पदे भरती करण्यासाठी प्रक्रिया राज्य शासनाने सुरु केलेली आहे. MPSC आणि सरळ सेवा भरतीने ही प्रक्रिया होते आहे. मात्र यासाठी मोठी भरती प्रक्रिया आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया, लेखी परीक्षा त्यानंतर मुलाखती होतात. त्यातच वर्षभरापेक्षा जास्त कालावधी लागतो. पण आता चट इंटरव्ह्यू आणि पट नोकरी ही योजना सुरु करण्यात येत आहे. महायुती सरकार या योजनेच्या माध्यमातून खासगी कंपन्यांमध्ये नोकरी देणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून कौशल्य विकास विभागाने हा उपक्रम हाती घेतलेला आहे. या विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यावर आयोजनाची जबाबदारी दिलेली आहे.
Balasaheb Thackeray | बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिन; दोन्ही गटांत राडा
नागपूरमधून होणार सुरुवात
राज्य शासनाच्या मुलाखतीनंतर नोकरी योजनेची सुरुवात नागपूरमधून होणार आहे. त्यासाठी कोणत्या कंपनीत किती पदांची भरती होणार आहे, त्यासाठी पात्रता काय आहे, याची माहिती दिली जाणार आहे. युवकांच्या बायोडाटांची छाननी करुन मुलाखती घेतल्या जातील. त्यानंतर त्याच ठिकाणी ऑफरलेटर दिले जाईल. नागपूरच्या या मेळाव्यासाठी नोंदणी आठवड्याभरात सुरु होणार आहे.
मेळाव्यासाठी पाच कोटी रुपये
राज्य सरकारने या मेळाव्यासाठी पाच कोटी रुपये दिलेले आहे. खासगी कंपन्यांमध्ये भरती सरकारमार्फत करण्यासाठी ही योजना तयार केलेली आहे. सरकारीच नाही तर खासगी नोकरी राज्यसरकार देणार, अशी प्रतिमा उभारण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी संपुर्ण राज्यभर ही प्रक्रिया राबवली जाणार आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम