– तुषार शिल्लक
अतिथी संपादकीय ; मालेगावच्या राजकारणात सध्या चलबिचल सुरू झालेली आहे. २०२४ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कृषीमंत्री दादा भूसे यांचा पाडाव करण्यासाठी विरोधक एकवटल्याच्या घटना घडू लागल्या आहेत. ह्या चर्चेला उधान आलं ते अद्वय हिरें यांच्या पुन्हा भाजप सक्रीयतेनंतर… मागच्या जिल्हा परिषद पंचायत समित्यामध्ये भाजपने अद्वय हिरेंच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात मुसंडी मारली आणी सेनेला बॅकफूटवर नेलं. आगामी काळात विधानसभेत भाजपचाच आमदार होईल अशा चर्चेला उधान आलं होतं, मात्र लोकसभेची उमेदवारीची माळ पून्हा सुभाष भामरेंच्या गळ्यात पडल्यामुळे नाराज झालेले अद्वय हिरे यांनी भाजप पासून आलीप्त राहण्याचा निर्णय घेतं कॅांग्रेसच्या कुणाल पाटलांच्या पाठीशी आपली सगळी यंत्रणा आणी ताकद पणाला लावली,मात्र या निवडणुकीत पुन्हा सुभाष भामरेंचा दणदणीत विजय झाला.
पुढे विधानसभेच्या निवडणुकीत भाजप-सेना युतीमुळे भूसेंना टक्कर देण्यासाठी अद्वय हिरे यांची मनधरणी करतं राष्ष्ट्रवादीची जागा असूनही नवा कोरा आणी सर्वसामावेशक चेहरा असलेल्या काँग्रेसच्या तुषार शेवाळेंना सर्वांमते उमेदवारी देण्यात आली, निवडणुकीचा एकुण झंझावात बघता शेवाळेंचा विजय जवळपास निश्चीत असल्याचं दिसत असतांना ऐनवेळेस भूसेंनी आपली राजकीय फासे फिरवले आणी एका रात्रीत पराभव विजयात बदलून सलग चौथ्यांदा भूसें पुन्हा निवडणुन आले.
उपेक्षित असलेला विजय पराभवात बदलल्यामुळे सगळेचं नेते व्यथीत होऊन कारणमिमांसा करू लागले.
या पराभवाने व्यथीत झालेले अद्वय आबा हिरे राजकारणातुन आलिप्त दिसू लागले.याचं दरम्यान चर्चा रंगत होती ती बंडू काका बच्छाव यांची भूसेंचे खंदे समर्थक असलेले बच्छाव मागच्या निवडणुकीपासून आलिप्त दिसू लागले होते,मात्र मागच्या विधानसभेत त्यांना मनवण्यात भूसेंना यश आलं मात्र ही नाराजी आत्ताच्या घडीला मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. गेल्या दिड वर्षापासून बंडू काकांची नाराजी उघड उघड दिसू लागली आहे.
मालेगावच्या राजकारणात बच्छाव जायंट किलर ठरतील अशी चर्चा सुरू आहे. भूसेंना पर्याय म्हणून बच्छाव सक्षम आहेत शिवाय त्यांना माननारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे भाजप तर्फे बंडू काकांनी विधानसभा लढवावी अशी सगळीकडेचं चर्चा आहे.
दरम्यान राजकारणापासून आलीप्त असलेले अद्वय आबांनी जळगावात गिरीश महाजन व जयकुमार रावल यांची भेट घेऊन आपण पक्षात कार्यरत होणारं असल्याची ग्वाही देताचं जिल्हा परिषद आणी पंचायत समितीची संपुर्ण जबाबदारी पक्षाने त्यांच्या पारड्यात टाकली. यावेळी महानगरप्रमुख सुनिल आबा गायकवाड हे देखील सोबत होते शिवाय गायकवाड आणी आमच्यात कसलेच मतभेद नाहीत, असं सांगून तटस्थ असलेले अद्वय आबा आता पुन्हा सक्रीय झाले. त्यानंतर सुनिल आबा गायकवाड आणी अद्वय आबा यांनी बंडू काका बच्छाव यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांना भाजपात यावे अशी गळही घातली त्यांच्या ह्या मागणीला बंडू काकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला शिवाय योग्य वेळी लोकआग्रहास्तव निर्णय घेण्याची वेळ आली तरी नक्कीच विचार करू असा संकेतही त्यांनी दिला.
एकंदरीत मालेगाव बाह्य मध्ये भूसेंना मात देण्यासाठी विरोधकांची मोर्चे बांधणी सुरू झालेली असली तरी भाजपच्या एका कार्यक्रमात माजी मंत्री बावनकुळेंना मूळच्या भाजप गटाने आम्हाला बाहेरचा उमेदवार लादू नका अशी निनवणी केली होती. मुळात मालेगाव भाजप मध्ये असलेला अंतर्गत कलह व भाजपच्या असलेल्या गटांमुळे भूसेंना पून्हा फायदा होईल की सगळ्यांना मनवण्यात भाजप यशस्वी होईल हे येणारा काळचं सांगेल. परंतु येणाऱ्या विधानसभेत बंडू काका जायंट किलर ठरतील हे मात्र नक्की.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम