मराठा आरक्षण | मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी सुरू केलेलं आंदोलन तूर्तास मागे घेतलेलं आहे. राज्यातील सरकारला आरक्षणावर अंतिम निर्णय घेण्यासाठी दोन महिन्यांचा वेळ देण्यात आलेला आहे. मात्र आता आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या २४ तासांत मराठवाड्यातील चार तरुणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. बीड, लातूर आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील चार तरुणांनी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता मराठा आरक्षणासाठी सुरू झालेले आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.
मनोज जरांगे पाटील पुन्हा करणार राज्याचा दौरा; जरांगेंचा मेगा प्लॅन आला समोर
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठवाड्यातील संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशीव या जिल्ह्यांतील अनेक गावांमध्ये साखळी उपोषण सुरू आहेत. मराठा आंदोलकांनी सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना गावबंदीदेखील केलेली आहे. मात्र आता मनोज जरांगे पाटलांनी आमरण उपोषण मागे घेतलेले असले तरी मराठवाड्यात तरुण आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या करत असल्याचे विदारक चित्र समोर आलेलं आहे. बीड जिल्ह्यातील अमोल रोहिदास नांदे, प्रेमराज किशोर जमदाडे, नांदेडमधील तुकाराम मोरे आणि संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील कृष्णा जगताप या तरुणांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केल्याची माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे आता या प्रकरणावरून नवा राजकीय वाद पेटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Breaking News । एकनाथ खडसेंना हृदयविकाराचा झटका; तातडीने मुंबईला हलविणार
मराठा आरक्षणासाठी शिंदे-फडणवीस सरकारने शिंदे समितीची घोषणा केलेली आहे. मराठवाड्यातील निजामकालीन दस्तावेज समितीकडून शोधले जाणार आहेत. टिकणारे आरक्षण देण्यासाठी सरकारला अधिक वेळ हवा असून तो मनोज जरांगे पाटलांनी द्यावा, अशी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेली आहे. त्यानंतर मनोज जरांगे पाटलांनी सरकारला दोन महिन्यांचा वेळ दिलेला आहे. दिलेल्या वेळेत सरकारने आरक्षण न दिल्यास थेट मुंबईत आरक्षणाच्या मागणीसाठी भव्य मोर्चा काढणार असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम