Maharashtra Monsoon session ; पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेचे कामकाज अवघ्या अर्ध्या तासातच दिवसभरासाठी तहकूब करण्यात आल आहे.
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. अजित पवारांच्या बंडा नंतर हे पहिलंच अधिवेशन आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडत बंड पुकारल्यानंतर जवळपास 40 आमदारांना सोबत घेऊन आठ जणांसह मंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर राज्यामध्ये अनेक नाट्यमय घडामोडी बघायला मिळाल्या आहेत. त्यातच आज पासून सुरु झालेल पावसाळी अधिवेशन विरोधी पक्षनेताच नसल्याने वादग्रस्त ठरेल अशा जोरदार चर्चा सुरू होत्या.
आजच अधिवेशन सुरू होण्याच्या काही वेळ आधीच काँग्रेस कडून विरोधी पक्ष नेता काँग्रेसचाच असेल असा विश्वास व्यक्त केला गेला तर दुसरीकडे खोके सरकार हाय हाय, घटनाबाह्य कलंकित सरकारचा धिक्कार असो, आधी होते खोके सरकार आता झाले बोके सरकार अशा घोषणा देत सत्ताधाऱ्यांचा कडकडीत विरोध करण्यात आला होता.
https://thepointnow.in/congress-strike-on-vidhanbhavan/
अधिवेशनाला सुरुवात झाल्यानंतर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्यात आल्याचे बघायला मिळालं. अधिवेशनाला सुरुवात झाल्यानंतर सर्वात आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नव्या मंत्र्यांची ओळख सभागृहाला करून दिली. नंतर विधिमंडळाच्या कामकाजाला सुरूवात करण्यात आली. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी दालनात प्राप्त झालेले सर्व निवेदन नाकारण्यात येत असल्याचे सांगताच विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली.
*बाळासाहेब थोरात यांनी मांडले अनेक मुद्दे*
महाराष्ट्रातील पावसाची स्थिती गांभीर्याने घेण्याची गरज आहे. राज्यातील ५० टक्के भागात अजून पाऊस नाही. फक्त २० टक्के पेरण्या झाल्या आहेत. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. अतिवृष्टी, गारपीट यानेही शेतकऱ्यांच अतोनात नुकसान झाल आहे. मात्र अजूनही शेतकऱ्यांना मदत मिळाली नाहीये. मोठ्या प्रमाणात बियाणे, खते बाजारात आले आहेत. काही ठिकाणी सरकारी टोळी हफ्ते वसुली करत आहेत. पण दुर्दैवाने सरकार म्हणून शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे कुणाचही लक्ष नाहीय. मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटप, दिल्ली वारी यामुळे सरकारचे शेतकऱ्यांकडे लक्ष नाही. अस म्हणत बाळासाहेब थोरतांनी सभागृहात स्थगन प्रस्ताव आणून त्यावर चर्चा करावी अशी मागणी केली.
*उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले.*
विरोधी पक्षाने जो प्रश्न उपस्थित केलाय शासनाला त्याचे गांभीर्य आहे. राज्यात काही भागात पाऊस कमी झाला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ८० टक्केच पेरण्या राज्यात झाल्या आहेत. यात पुणे, नाशिक विभागात पेरण्या कमी झाल्या असल्याचा याबाबतचा आयएमडीचा अहवाल सरकारला प्राप्त झाला आहे. येत्या आठवडाभरात चांगल्या पावसाचा अंदाज दाखवला आहे. पेरण्या होऊ शकल्या नाही यामुळे दुबार पेरणीची वेळ आलीच तर यासाठी सरकारने नियोजन केले आहे. १० हजार कोटी रुपये गेल्या वर्षभरात शेतकऱ्यांसाठी मदत केली आहे. काही शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण नाही म्हणून त्यांना मदत मिळाली नाही. मात्र ते देखील काम सुरू आहे. कुठल्याही परिस्थितीत हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला.
याचबरोबर बोगस बियाणे, खते याविरोधात आणखी कडक कायदा करण्याचा सरकारचा विचार असून काही ठिकाणी खत, बियाणांच्या बाबतीत जी काही बोगसगिरी होतेय तो दखलपात्र गुन्हा असून यातील दोषींना जामीन मिळणार नाही असा कठोर तरतुदी या कायद्यात करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याबाबत रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात बैठक झाली असून योग्य त्या उपाययोजना आणि निर्णय घेतल्याची माहिती फडणवीसांनी सभागृहाला दिली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम