Political Justic : काल-परवापर्यंत एकमेकांवर खालच्या पातळीवर आरोप करणारे आज एकत्र येतात आणि वेळ आली की सत्तेत राहून एकत्र मंत्रीपदाचीही शपथ घेतात, हे आपण महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींमधून अनुभवले आहे. पण याचा परिणाम खालच्या पातळीवर कसा होतो, याचे उत्तम उदाहरण मुंबई उच्च न्यायालयात नुकतंच बघायला मिळाल आहे.
चार दिवसांपूर्वी भाजप-शिंदे गटासोबत सत्तेत सामील होऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. या नऊ मंत्र्यांमध्ये हसन मुश्रीफ यांचाही समावेश आहे. अगदी काही महिन्यांपूर्वीच ईडीने मुश्रीफ यांच्यावर कारवाई केली होती. त्यांच्या कोल्हापूर, मीरज आणि कागल येथील मालमत्तांवर छापे मारले होते. त्यानंतर मुश्रीफ यांना कधीही अटक होऊ शकते, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, त्यांच्याविरोधात कोल्हापूरच्या मुरगुड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. हे सारे राजकीय हेतूने होत असल्याचे मुश्रीफ यांनी त्यावेळी म्हटले आणि उच्च न्यायालयात धाव घेतली.
तर न्यायाधीश नितीन सांबरे व न्यायाधीश आर.एन. लढ्ढा यांच्या खंडपिठापुढे या प्रकरणावर सुनावणी सुरू झाली. सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सरकारी वकिलांनी सूचना घेण्यासाठी वेळ मिळावा, अशी विनंती यावेळी केली गेली. यावर न्यायालयाने मुश्रीफ यांच्या बाजुने विनंती करताय का? असा मिश्किल सवाल देखील केला.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम