Maharashtra Political Crisis: अजित पवार यांच्या बंडामुळे राज्याच्या राजकारणामध्ये भूकंप झाला आहे. कोणता खरा राष्ट्रवादी पक्ष? हा प्रश्न सध्या जनतेच्या मनात आहे. सरकारमध्ये विद्यमान परिस्थितीत तीन पक्ष सहभागी आहेत. त्यामुळे एका पक्षाची नाराजी उफाळून येण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केल्यानंतर बंडखोर नेत्यांनी पक्ष संपत असल्याचं विधान केलं होतं. अजित पवार निधी देत नव्हते, ते पक्ष संपवत होते आणि राष्ट्रवादी वाढवत होते, असा ठपका ठेवण्यात आलेला होता. तर आता ज्या पक्षामुळे बंड केलं त्याच पक्षासोबत महायुती केल्यामुळे शिवसेनेत नाराजी दिसून येत आहे.
शिंदे गटाकडून वारंवार नाराजीच्या बातम्यांचे खंडण केलं जातं असल तरी घडणाऱ्या घडामोडी आणि शिवसेनेच्या आमदारांच्या माध्यमांवरील प्रतिक्रिया यातून शिवसेनेचे आमदार नाराज असल्याचं चित्र स्पष्ट आहे.
आज संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने शिवसेनेचे नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी नवश्या गणपतीचे दर्शन घेतले त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. कारण नवश्या गणपती हा नवस पूर्ती करण्यासाठी प्रसिद्ध आहे अशातच दादा भुसे काही नवस मनात घेऊन दर्शनाला गेले असावेत का?अशा चर्चा सध्या रंगत आहे.
Maharashtra Rape Case: पुराव्याअभावी बलात्काराचा आरोप असलेल्या डॉक्टरची निर्दोष मुक्तता, ६ वर्षे जुन्या खटल्याचा निकाल
अजित पवारांच्या शपथविधी नंतर काही दिवसांपूर्वीच नाशिकला नवीन पालकमंत्री मिळणार अशा चर्चा सुरू होत्या.कारण आता मंत्री पदाच्या शर्यतीत भुजबळ यांचा देखील समावेश झालाच आहे.
त्यामुळे दादा भुसे साहेबांना आपल्या पदाची चिंता आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम