चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना महामारी सुरु झाली आहे. रुग्णांची संख्या वाढत आहे आणि याच साठी चीन मध्ये लॉकडाऊन लावण्यात येत आहे. पण चीन मधील नागरिकांनी या लॉकडाऊन विरोधात आंदोलन सुरु केली आहेत. एकीकडे चीनमध्ये वाढता कोरोना तर दुसरी कडे महाराष्ट्रात गोवरच्या साथीने थैमान घातले आहे. पण महाराष्ट्रावर एवढे संकट आले आहे , अगदी लहान लेकरांपासून म्हाताऱ्यांपर्यंत सर्व गोवरच्या आजाराने त्रासले आहेत. पण राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी जनतेशी काहीच संवाद साधल्याचे दिसले नाही.
‘कोरोना महामारी मध्ये ठाकरे सरकार ने जनतेची काळजी घेतली होती. आता गोवरने त्रासलेल्या जनतेसाठी शिंदे सरकार काही उपाययोजना करणार का ? राज्याच्या आरोग्यमंत्र्यांना शोधण्यासाठी ‘आरोग्यमंत्री तानाजी सावंत दाखवा आणि एक लाख रुपये मिळवा’ असे जाहीर करण्याची वेळ येणे म्हणजे राज्याचे आरोग्य यंत्रणेचे अपयश च म्हणावे लागणार. चीनमध्ये जसे जनतेने आंदोलन केले तसे महाष्ट्रातील जनतेला करण्याची वेळ येऊ नये.’ अशी टीका उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या मधून केली आहे.
‘राज्यभरातील गोवरची संख्या दहा हजारांवर गेली आहे. कोरोनाचे पुन्हा एकदा आगमन होताना दिसत आहे. गोवर आणि कोरोना मुळे नागरिकांना पुन्हा एकदा आपला जीव गमवावा लागू नये. लॉकडाऊन ची परिस्थिती पुन्हा येऊ नये यासाठी शिंदे – फडणवीस सरकार ने उपाययोजना कराव्या. जनतेला पुन्हा एकदा त्याच परिस्थितीला सामोरे जावे लागू नये म्ह्णून प्रयत्न करावे ‘ , अशी टीका शिवसेनेनं शिंदे – फडणवीस सरकार वर केली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम