राजकारण म्हणजे मिमिक्री नाही ; राज ठाकरेंनी केलेल्या टीकेला संजय राउतांनी दिले उत्तर

0
40

रविवारी मुंबईतील गोरेगावमधील नेस्को मैदानात मनसेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात भाषण करताना राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर जबरदस्त टीका केली. कालपर्यंत हे मुख्यमंत्रीपदावर होते आणि आज तब्येतीच कारण सांगून घरी आहेत, असा टोला राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना लगावला. एवढेच काय तर त्यांनी या मेळाव्यात उद्धव ठाकरेंची नक्कल देखील करून दाखवली. आता पर्यंत उद्धव ठाकरेंवर एकही केस दाखल झाली नाही कारण त्यांनी कोणती भूमिकाच घेतली नाही असेही राज ठाकरेंनी सांगितले. मेळयावत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे तसेच शिवसेनेवरही टीका केली.

त्यांनतर संजय राऊत यांनी जेव्हा माध्यमांशी संवाद साधला तेव्हा त्यांनी या मेळाव्या विषयी आणि झालेल्या टीकेविषयी प्रत्युत्तर दिले. ‘मिमीक्री पाहायची असेल तर आम्ही जॉनी लिव्हर, राजू श्रीवास्तव यांची मिमिक्री पाहू. राजकारण म्हणजे मिमिक्री नाही.’, असे संजय राऊत यांनी म्हटले. वेगवेगळ्या व्यक्तींच्या नक्कला करून झाल्या असतील तर आता महाराष्ट्राकडे लक्ष द्या, असा सल्ला देखील राऊत यांनी राज ठाकरेंना अप्रत्यक्षपणे दिला आहे.

‘आमचा पक्ष संकटात असूनही आम्ही या परिस्थीला न घाबरता सामोरे जात आहोत. आमच्यावर टीका करण्याआधी बुलढाण्यातील सभा आणि त्या सभेला जनतेचा मिळालेला प्रतिसाद पाहायला हवा होता.’ असे राऊत यांनी म्हटले आहे.

राहुल गांधींनी मागील ३ महिन्यांपासून जी मेहनत घेत आहेत त्याचे आम्हाला कौतुक आहे. आणि त्यांच्यावर टीका करण्याआधी जरा ती मेहनत आपण घेऊन दाखवावी असे असे आव्हान संजय राऊत यांनी केले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here