ज्यांना वृद्धाश्रमातही जागा नसते त्यांना राज्यपाल नेमलं जातं का? असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे. केंद्र सरकार सोबत विचार जुळले कि त्या माणसांना राज्यपाल म्हणून नेमले जाते,मग त्यांची त्या पदासाठी पात्रता आहे का याचा विचार केला जात नाही, असे वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केले आहे. केंद्राने हे सॅम्पल परत न्ह्यावे अन्यथा महाराष्ट्र बंद ची हाक देऊ आणि आंदोलन करू असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला आहे.
राज्यपालांनी काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांवर जे वादग्रस्त विधान केले होते त्यामुळे उद्धव ठाकरेंनी राज्यपालांवर निशाणा साधला आहे.ते म्हणाले की, त्यांच्या सडक्या मेंदूच्या मागे कोण आहे याचा शोध घ्यायला हवा. राज्यपाल निष्पक्ष असावा, राज्यात काही पेचप्रसंग निर्माण झाला तर त्याची सोडवणूक त्यांनी करावी. पण आपले राज्यपाल काहीही बोलत सुटतात. महाराष्ट्राची बदनामी करत आहेत. आता राज्यपाल जे काही बोलले ते गांभिर्याने घेण्याची गरज आहे. कुणीही व्यक्ती केवळ राज्यपाल म्हणून काहीही बोलला तर ते सहन केलं जाणार नाही. काही दिवसांपूर्वी त्यांनी ठाण्यात मराठी लोकांचा अपमान केला होता, सावित्रीबाई फुलेंबद्दलही चुकीचं वक्तव्य केलं होत . आता शिवाजी महाराजांबद्दल त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे .
महाराष्ट्राच्या अस्मितेवर हल्ला करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. आता जर राज्यपालांना पदावरून मुक्त केलं नाही तर अशा देशद्रोह्यांविरुद्ध एकत्र येऊन आंदोलन करण्याची गरज आहे. सगळ्यांनी एकत्र येऊन आवाज उठवला पाहिजे. . वेळ आली तर महाराष्ट्र बंद पाडू , शांततापूर्ण मार्गाने महाराष्ट्र बंद करू. महाराष्ट्र हा लेचापेच्यांचा नाही हे केंद्राला दाखवून देऊ. त्यासाठी महाराष्ट्र बंदमध्ये सर्वांनी सामील व्हावं.
राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्यांच्याविरोधात राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. राज्यपालां विरोधी आंदोलन केलं जात आहे. आता राज्यात मिंधे सरकार आल्यापासून कुणीही यावे आणि टपली मारुन जावे अशी अवस्था झाली आहे, महाराष्ट्राची सातत्याने अहवेलना सुरू असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम