आदित्य ठाकरें नितीश-तेजस्वी यांच्यात मनोमिलन, मुंबईत बिहारींवर झालेल्या हल्ल्याबाबत दिले हे उत्तर

0
35

पाटणा : कधी काळी शिवसेना ही बिहारींच्या विरोधात होती मात्र आता राजकीय परिस्थीती बदलली आहे. शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे बुधवारी पाटण्यात पोहोचले. सर्वप्रथम ते बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. येथे दोन्ही नेत्यांमध्ये संवाद झाला. यावेळी प्रियांका चतुर्वेदी आणि अनिल देसाई देखील उपस्थित होते. आपण प्रथमच येथे येत असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. इथे मिळालेले स्वागत आणि प्रेम अविस्मणीय आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले की, मी तेजस्वी यादव यांच्याशी अनेकदा बोललो आहे. मात्र पहिल्यांदाच भेटलो असून इतर कोणत्याही स्तरावर याला नेऊ नका. चांगली मैत्री कायम ठेवा. ही मैत्री यापुढेही कायम राहील. एकत्र काम करू सर्व तरुणांनी एकत्र यावे. बघितलं तर आमचं वयही जवळपास सारखेच आहे. मुंबईत बिहारींवर हल्ले होतात, या प्रश्नाला उत्तर देताना आदित्य ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला. हे काम भाजपचे लोक करतात असे म्हणत प्रश्नाला बगल दिली.

नितीश आणि तेजस्वी यांचे कौतुक

आदित्य ठाकरे यांनी पुढे नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांचे कौतुक केले आणि बिहारमध्ये चांगले काम सुरू असल्याचे सांगितले. नितीशकुमार यांचीही भेट घेतली. विविध विषयांवर चर्चा झाली. पर्यावरण आहे, विकास आहे. आदित्य ठाकरे म्हणाले की, ज्या तरुणांना या देशासाठी काम करायचे आहे, महागाई विरोधात काम करायचे आहे, रोजगार संविधानासाठी काम करायचे आहे, सर्वांनी बोलत राहिले तर ते देशात काहीतरी चांगले करू शकतील. आज सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे भेटायचं होतं. ही मैत्री कायम राहील. त्यासाठी राजकारण करण्याची गरज नाही. काम कोणीही करू शकतो.

काय म्हणाले तेजस्वी यादव?

या बैठकीबाबत तेजस्वी यादव म्हणाले की, जेव्हा तरुण धोरण आणि निर्णय घेण्याच्या क्षेत्रात येतो आणि नेतृत्व करतो तेव्हा ही आनंदाची बाब आहे. आता संविधान वाचवण्याचे आणि लोकशाही वाचवण्याचे आव्हान आहे. ते वाचवण्यासाठी आम्ही वाट्टेल ते करू.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here