द पॉईंट नाऊ ब्युरो : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत कोणी बदनामी करत असेल, तर आम्ही गप्प बसणार नाही. असे राष्ट्रवादी काँग्रेस नेते तथा मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.
मागील काही दिवसात शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह शब्दात टिप्पणी करण्याच्या बऱ्याच घटना घडल्या. तसेच शरद पवार यांच्यावर अनेक आरोप देखील करण्यात आले. त्यावर बोलतांना आव्हाड यांनी शरद पवार यांना सतत बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आमच्या बापाची बदनामी होत असेल, तर आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा दिला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे, माजी मंत्री महादेव जानकर, तसेच बऱ्याच भाजप नेत्यांनी देखील शरद पवार यांच्यावर टीका केली होती. यादरम्यानच्या काळात शरद पवार यांच्यावर झालेल्या आक्षेपार्ह टिप्पण्यांमुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. आता जितेंद्र आव्हाड यांनी देखील याबाबत बोलतांना इशारा दिला. महात्मा गांधींना जसे बदनाम केले गेले, तसे शरद पवारांना बदनाम केले जात आहे. असे म्हणत आव्हाड यांनी शरद पवारांची तुलना महात्मा गांधींशी केली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम