मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे काढण्यासाठी राज्य सरकारला ४ मे रोजीचा अल्टीमेटम दिला आहे. मनसे नेते आणि पदाधिकारी यांना पोलिसांनी नोटीस देखील बजावली आहे. दिलीप वळसे पाटील यांनी आढावा बैठक देखील घेतली आहे. तर बैठकीनंतर गृहमंत्री मुख्यमंत्र्यांची भेट देखील घेणार आहेत.
राज्यातील वातावरण भंग झाले असल्याने राज्यातील कायदा व सुव्यवस्था आबाधित ठेवण्यासाठी गृहमंत्री दिलीप -वळसे पाटील यांनी पोलीस विभागाला सक्त सुचना दिल्या आहेत. आढावा बैठक पार पडल्यावर गृहमंत्री वळसे-पाटील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट निवासस्थानी घेणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी शिवसेना नेते व खासदार संजय राऊत मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत.
या बैठकीत नक्की काय चर्चा होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. कायदा व सुव्यवस्था हातळण्यास पोलीस सक्षम आहेत. समाजकंटकांवर योग्य ती कारवाई करण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न केल्यात त्यांच्यावर कारवाई केली जाईल. राज्याने शांतता पाळण्यात यावी”, असे आवाहन पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी केले आहे.
औरंगाबाद पोलीस आयुक्तांनी राज ठाकरेंच्या भाषणाचा अभ्यास केलेला आहे. आवश्यकता वाटल्यास आजच राज ठाकरेंवर पोलीस कारवाई करतील. कोणीही कायदा हातात घेऊ नये अन्यथा कडक कारवाई केली जाईल”, अशीही माहिती पोलीस महासंचालक यांनी दिली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम