” …तेव्हा तुम्ही रांगत होतात ” भाजपचा आदित्य ठाकरेंवर पलटवार

0
35

मुंबई प्रतिनिधी : राज्यात सुरु असलेल्या भोंग्याच्या वादा बरोबर आता बाबरी मशिदीचा मुद्दा पुन्हा एकदा वर आल्याचं दिसून येतयं. विरोधिपक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या भाषणात  केलेल्या ” बाबरी पडली तेव्हा आमच्या नेत्यांसह मी ही तिथेच होतो , शिवसेनेचा एक ही नेता तिथे नव्हता ” ह्या वक्तव्यावर शिवसेना नेते आणि पर्यटन मंत्री आदीत्य ठाकरेंनी फडणवीसांवर ” १८५७ च्या लढयात देवेंद्र फडणवीसांचे खुप योगदान आहे “. अशी  खोचक टिका केली होती . त्यालाच प्रत्यूत्तर देत भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी फेसबुकच्या माध्यमातून त्यांचावरती निशाणा साधला .  

‘ आयत्या पिठावर रेघोट्या ‘ या आपल्या फेसबुक पेज वरील मथळ्याखाली लिहीताना उपाध्ये यांनी ” आयत्या पिठावर रेघोट्या ओढत मंत्री झालेले आदीत्य ठाकरे आपल्या पिताश्रींच्या पावलांवर पाऊल टाकत देवेंद्र फडणवीसांवर काहीतरी कुचकट टोमणे मारतायत म्हणे , अहो आदीत्यजी या घटना घडल्या तेव्हा तुम्ही रांगत होतात त्यामुळे तुम्हाला इतिहास माहिती असण्याची शक्यता नाही . तेव्हा ज्या उथळपणे व्यक्त झालात त्यातून एकूणच या प्रकरणाचे गांभीर्य तुम्हाला कीती आहे हे स्पष्ट होतं , ” अशी टिका केली .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here