मुंबई प्रतिनिधी : संभाजीनर मध्ये पार पडलेल्या राज ठाकरेंच्या सभेनंतर राजकीय वातावरण चंगलच तापलेले दिसून आलं. राज ठकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांवर जातीपातीचेराजकारण केल्याचा घाणाघाती आरोप केला. ” राष्ट्रवदीच्या उदया नंतर महाराष्ट्रात जातीयवाद सुरू झाला. पूर्वी महाराषट्रात आपल्या धर्माचा आदर प्रत्येकाच्या मनात होताच परंतु , दुसऱ्याच्या धर्मा विषयी द्वेष निर्माण करण्याचे काम राषट्रवादी काँग्रेस ने केलं ” असा आरोपही त्यांनी केला होता . सोबतच रायगडावरील महाराजांची समाधी लोकमान्य टिळकांनी बांधली असा दावा ही त्यांनी केला होता .
राज यांच्या या दाव्यांनंतर राज्यात नव्या वादाची ठिणगी पेटल्याचे पाहायला मिळाले. संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांनी राज यांच्या भाषणातील वक्तव्यांवर आक्षेप घेत ” राज ठाकरे खोटा इतिहास सांगून जातीवादाचं राजकारण करू पाहातायत , राज ठाकरेंना अटक करावी अशी आमचा मागणी आहे . राज ठाकरेंना अटक करून शांतता प्रस्थापित करावी. आम्ही ह्या बाबतीत शरद पवारांची भेट घेतली आहे असे म्हणत राज ठाकरेंच्या अटकेची मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम