मुंबई प्रतिनिधी: गुढीपाडव्यापासून सुरू झालेल्या राज ठाकरेंच्या सभांच चक्रीवादळ आज औरंगाबादमध्ये धडाडणार आहे . या सभांमध्ये राज ठाकरेंनी उचललेल्या लाऊडस्पीकरच्या मुद्यावरून सध्या राज्यात चांगलच राजकारण रंगत आहे .
सर्वच पक्षातील नेते ह्या मुद्यावर आपापली मते मांडत एकमेकांवर टिकास्त्रांचे बाण सोडत आहेत . तर राज ठाकरेंनी ठाण्यातील उत्तरसभेत राज्यसरकला दिलेलं ३मे पर्यंतच अल्टीमेटम ह्या सगळ्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनसेवर हिंदुत्त्वावरून निशाणा साधला होता . त्याला उत्तर देत आता मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांवर बॉलिवुडच्या प्रसिद्ध चित्रपट शोलेतील असरानींप्रमाणे मुख्यमंत्र्यांची अवस्था झाली आहे असे म्हणत टीका केली आहे . ” अर्धे मनसेवर तुटून पडा , अर्धे भाजपावर तुटून पडा आणि आम्ही घरी बसतो ” , असे बोलत मुखमंत्र्यांनी हिंदुत्वावरुन विचारलेल्या प्रश्नांना संदीप देशपांनडेंनी सडेतोड उत्तर दिले .
सोबतच ” राज ठाकरेंनी फक्त कायद्याचे पालन करायला सांगितलयं , सरकारकडूनही आम्हाला तीच अपेक्षा आहे . तेव्हा आम्हाला धमक्या देण्यापेक्षा जे लोक कायद्याचे उल्लंघन करतायत त्यांच्यावर कारवाई करण्याची धमक तुमच्या तथाकथीत हिंदुत्ववादी सरकारने दाखवावी ” . अशी खोचक टिका करत मुख्यमंत्र्यांवर घाणाघात केला . त्याच बरोबर ” आजच्या सभेत राज ठाकरे काय बोलणार ह्या बाबात आम्हालाही उत्सुकता आहे , आज ते काय बोलणार हे कुणीच सांगु शकत नाही .” हे देखील त्यांनी सांगितले .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम