मुंबई प्रतिनिधी : सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय म्हणजे राज ठाकरेंची औंगाबादेतील सभा ह्याच पार्श्भूमीवर महासुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे भाजपाचे अजेंडे राबवत आहेत असे म्हणत राज यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.
राज ठाकरेंची सध्याची एकंदरीतच भूमिका बघता समाजात मतभेद , जातीय तेढ निर्माण करण्याचा अजेंडा भाजपाने राज ठाकरेंवर सोपवला आहे अशी शंका ही त्यांनी उपस्थित केली. तर भाजपा आणि मनसे एकत्र आल्यास मनसेचे राहिलेले स्वतंत्र अस्तित्व उरणार नाही असे देखील ते म्हणाले.
मशिदींच्या भोंग्यांवरुन सुरु झालेलं राजकारण सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर गाजत आहे. मिशवींवरील भोंग्यांना हनुमान चालीसेने उत्तर देणार असा इशारा राज ठाकरेंनी दिला होता. त्यातच ३मे ला औरंगाबादेत होणारी त्यांची सभा आणि त्याचबरोबर राज यांनी सरकाला भोंगे हटवण्यासाठी दिलेला अल्टीमेटम ह्या वरच भाष्य करतं बाळासाहेब थोरातांनी राज ठाकरेंच्या भूमिकेवर टिका करत आपले मत मांडले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम