औरंगाबादला जाण्याआधी राज ठाकरे पुण्यात आले आहेत. पुण्यात शंभर पुरोहितांकडूम मंत्रपठण आणि गाड्यांवर फुलांचा वर्षाव असं त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. मनसेचे नेते वसंत मोरे गैरहजर असल्याने त्यांनी मनसे सोडली की काय असा प्रश्न उपस्थित होतोय.
राज ठाकरेंच्या मुंबई आणि ठाण्यातील सभांना हजेरी लावणारे वसंत मोरे मात्र त्यांच्या पुणे दौऱ्यात उपस्थित नव्हते. त्यांच्या गैरहजेरीमुळे पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. राज ठाकरे पुणे दौऱ्यावर असताना शहरातील सर्व पदाधिकारी हजर असतात. पुण्यातील राजमहाल इमारतीत ठाकरे वास्तव्यास असतात. औरंगाबादला जाण्यापूर्वीही ठाकरे पुण्यात आले आहेत. या दौऱ्यात शंभर पुरोहितांकडून मंत्रपठण आणि काही धार्मिक विधी झाले आहेत. मात्र, राज ठाकरे आल्यापासून वसंत मोरे हे कुणालाही दिसलेले नाहीत.
वसंत मोरे हे २ दिवसांपासून आजारी असून, ते थेट औरंगाबादमधील सभेला उपस्थित राहणार असल्याचं मनसे नेत्यांकडून सांगितलं जात आहे. राज ठाकरेंच्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यातील भाषणानंतर मोरेंनी त्यांच्या प्रभागातील मशिदींमसोर भोंगे लावणार नाही,अशी भूमिका घेतली होती.त्यांच्यावर राज ठाकरे नाराज झाले होते. परंतु ठाण्याच्या सभेचं निमंत्रण राज ठाकरेंनी वसंत मोरेंना दिलं होतं. या सभेत वसंत मोरेंनाही सर्वांत आधी भाषण करण्याची संधी मिळाली होती. मात्र मोरे हे मनसे सोडून इतर पक्षात जातील, अशी चर्चा सुरू होती
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम