मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या १ मे या दिवशी औरंगाबाद मध्ये होणाऱ्या सभेला २८ एप्रिलला पोलिसांनी १६ अटींसह अनुमती दिली आहे. त्यासाठी आयुक्तालयात सकाळपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या किमान ३ बैठका झाल्या.
राज ठाकरे यांची औरंगाबाद सभा सर्वाधिक चर्चेची ठरणार असल्याचं स्पष्ट झालं. राज ठाकरेंच्या या सभेकरिता योग्य पद्धतीने नियोजन करण्यात आलेले आहे. शहरातील २० मंदिरांत महाआरती करत फेरी काढून मनसैनिकांनी वातावरणनिर्मिती केली. शहरात होर्डिंग्ज आणि झेंडे लावण्यात आले आहेत. २५ सहस्र पत्रिका वाटण्यात आल्या आहेत. कर्णपुरा येथील मैदानात वाहनतळाची व्यवस्था केली आहे. तेथून सभास्थळी जाण्यासाठी विनामूल्य रिक्शा सोय आहे. ८० सहस्र क्षमतेच्या मैदानात ५० सहस्र आसंद्यांची व्यवस्था आहे. मैदानाच्या बाजूला असलेल्या पायऱ्यांवर ८ ते १० सहस्र लोक बसू शकतील.
कोणत्याही प्रकारच्या शिस्तीचा भंग न होता योग्य रीतीने ही सभा पार पडण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. तसेच या सभेनंतर दंगल होण्याची चिन्ह दिसत आहे.याकरता राज ठाकरे यांच्या सभेकरता मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर चारही दिवस ३०० पोलीस तैनात करण्यात आले. वरिष्ठ सूत्रांच्या माहितीनुसार शहरात एकूण ३ सहस्र ५०० पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आहेत. तर मैदानाभोवती किमान २ सहस्र पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांचा वेढा रहाणार आहे. त्याशिवाय ५ जिल्ह्यांमधून ३०० पोलीस कर्मचारी येणार आहे. राज्य राखीव दलाच्या ६ तुकड्याही मागवण्यात आल्या आहेत.तर मैदानात ४ सीसीटीव्ही उपलब्ध असून या संख्येत आणखी १० ते १५ सीसीटीव्ही सोय होईल.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम