द पॉईंट नाऊ ब्युरो : शिवसेनेने काँग्रेस अन राष्ट्रवादीची साथ पकडून सत्ता स्थापन केल्यापासून भाजप अन शिवसेनेत रोजचीच एकमेकांवर चिखलफेक चालू आहे. भाजप नेते अनिल बोंडे यांनी आता हिंदू शिवसेनेची साथ सोडत असल्याने उद्धव ठाकरेंच्या पायाखालची जमीन सरकली असं वक्तव्य केलं आहे.
शिवसेना ही राष्ट्रवादीची बी टीम आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे केवळ हिंदूंची मते वळवण्याससाठी शिवसेनेचा वापर करत असल्याची टीका केली आहे. तर संजय राऊत हर राष्ट्रवादीचे चमचे असल्याची टीका बोंडे यांनी केली आहे.
भाजप आणि शिवसेना नेत्यांमध्ये रोजचीच चिखलफेक होत आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी रोजच्याच झाडल्या जातात. त्यात आता बोंडे यांच्या या वक्तव्याने शिवसेनेला चांगलेच डिवचले असणार हे नक्की.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम