द पॉईंट नाऊ ब्युरो : महाराष्ट्र विधानसभेत मागे भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन करण्यात आले होते. ते निलंबन सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाला वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी मात्र असंवैधानिक म्हटले आहे. सभागृहात होत असलेल्या कामकाजास सर्वोच्च न्यायालयात आवाहन देता येत नाही आणि सर्वोच्च न्यायालयाला त्यावर निर्णय देण्याचा अधिकारही नाही. असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने 12 आमदारांचे निलंबन रद्द केल्यानंतर, महाविकास आघाडी सरकारला विरोधी पक्षांनी मोठ्या प्रमाणावर धारेवर धरले होते. आता प्रकाश आंबेडकर यांच्या या वक्तव्यानंतर सत्ताधारी आणि विरोधी पक्ष काय मत मांडतात? हे लवकरच दिसेल.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम