राजकीय वर्तुळात खळबळ माजली का दिसत आहे एकीकडे राज ठाकरे आणि दुसरीकडे फडणवीस यांनी सहभाग घेऊन धुमाकूळ घातलेला आहे यांच्या सभेवर विरोधकांनी टीकास्त्र सोडले आहे. मुंबई येथे झालेल्या सभेदरम्यान फडणवीसांनी शिवसेनवर तर राज ठाकरेंनी औरंगाबाद येथील सभेत शरद पवारांवर सडकून टीका केली.
राज्यातील वातावरण तापलं असताना आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून देखील संताप व्यक्त केला जातो.याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शेरोशायरी करत विरोधकांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. “निकले हैं वो लोग हमारी शख्सियत बिगाड़ने जिनके खुद के किरदार मरम्मत मांग रहे हैं” , असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे.
राज ठाकरे व फडणवीसांनी त्यांच्या भाषणातून राष्ट्रवादी व शिवसेनेवर टीका केल्याने संजय राऊतांनी ट्विट करत त्यावरून निशाणा साधला आहे. राऊतांनी या ट्विटमध्ये शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रावादीचे अध्यक्ष शरद पवार यांना देखील टॅग केलं आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम