विरोधी पक्षाच्या अंगातील रावणाचा अंत करा – संजय राऊत

0
171

मुंबई प्रातिविधी : देवेंद्र फडणवीसांनी बाबरी मशीदीवरुन विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर देत शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलत असताना  ” आणखी किती काळ तुम्ही बाबरीच्या विषयावर बोलणार आहात ? देशात महागाई वाढतेय , बेरोजगारी वाढतेय , चीन घुसखोरी करतयं ह्या सगळ्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी हनुमान चालीसा आणि बाबरीच्या मुद्यावर भाजपा आणि त्यांच्याशी संबंधित पक्ष बोलत आहेत “. असे म्हणत फडणवीसांना टोला लगावला .

         ” बाबरी पडली तेव्हा शिवसेना कुठे होती असे विचारणाऱ्या अज्ञानांनी त्यांच्याच पक्षातील नेते सुंदरसिंह भंडारींना विचारावं . त्या काळातला सीबीआयने केलेला तपासाचा अहवाल पहावा. सीबीआयने केलेल्या तपासाची पानं व केंद्रीय गुप्तचर खात्याचा अहवाल तपासावा . शिवसेना कुठे होती आणि काय करत होती हे कळेल . ” असे सडेतोड उत्तर संजय राऊतांनी फडणवीसांना दिले. ” संपलेल विषय पुन्हा काढून फुलबाजे उडवायला झालं काय ? ” वेळ बदलली आहे वातावरण बदलल आहे , प्रश्न बदलले आहेत . असे असताना मूळ मुद्दा सोडून इतर प्रश्नात लोकांच लक्ष आकर्षित करण्याचे काम भाजपा आणि त्यांचे छुपे साथीदार करत आहेत , भोंग्यांपेक्षा इतर महत्वाचे विषय आहेत . या भोंग्यांमागे कोणाची वीज आहे हे देशाला माहिती आहे . हे हिंदुत्व नाही .” असे म्हणत राऊतांनी राज ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला . तर, राज ठाकरेंनी दिलेल्या अल्टीमेटम विषयी भाष्य करताना  ” कोणत्या कलमाखाली काय कारवाई होईल , हा कायद्याच्या चौकटीतील विषय आहे ” काहीही काम नसलेल्या विषयांवर बोलून तूम्ही राज्याच आणि देशाच राजकारण खराब करत आहात . हे राष्ट्रहिताच नसून तुम्ही राष्ट्राला आणि राष्ट्रीय एकात्मतेला ठेच पोहोचवताय . भोंग्यांमुळे लोकांना होणाऱ्या त्रासाबद्दल आम्ही जागृक आहोत . व त्या विरोधात लढलोही आहोत परंतु , कोर्टाच्या नकारामुळे प्रश्न सुटलेला नाही . देशात कायद्यांच राज्य आहे तेव्हा त्याच पालनं केलेच पाहिजे . हे लेचापेच्याचं राज्य नाही सरकारला काय करायच आहे हे माहिती आहे ” असे देखील संजय राऊत म्हणाले .

          सोबतच फडणवीसांनी विचारलेल्या ‘ तुम्ही रामाच्या बाजूने आहात की रावणाच्या ‘ ह्या प्रश्नाला उत्तर देत ” त्यांना रामायण पुन्हा वाचायची गरज आहे . त्यांनी रावणाचा इतिहास वाचवा. रावणाचा बळी अहंकाराने घेतला , रावण त्याच्या अहंकारा पाई धारातिर्थी पडला . काही लोकांना असलेल्या सत्तेचा अहंकार असतो तर काही लोकांचा अहंकार सत्ता गेल्यावरही जात नाही ” असे म्हणत विरोधी पक्षाच्या अंगात जो रावण संचारला आहे त्याचा आधी अंत करावा आणि मग महाराष्ट्राच्या प्रश्नांवर बोलावं असे म्हणत राऊतांना फडणवीसांना चोख प्रत्युत्तर दिले .

           


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here