दोन वर्षांपूर्वी कोरोनाची दुसरी तीव्र लाट होती. त्या काळात जातिभेद न म्हणता एकमेकांना माणुसकी दाखवून मदत करण्याचे हात पुढे केले. त्यामुळे सर्वांच भेदभाव विसरून जगण्याची धडपड करत होती. आता राजकारणात वातावरण वेगळ्याच मुद्द्यावरून प्रत्यारोप जाती भेद होऊ लागले आहे. मशिदीवरील भोंगे आणि हनुमान चालीसा प्रकरण सध्या चांगलेच गाजत आहे. यावरून आता सोशल मीडियात एकच चर्चा सुरू आहे.
याच मुद्द्याला अनुसरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही ट्विटरवर मत व्यक्त केलं. पवार यांनी म्हटलं आहे, ‘मागच्या वर्षी सर्व धार्मिक स्थळं बंद होती आणि याच काळात आपण जात-धर्म विसरुन एकमेकांचा जीव वाचवण्यासाठी, ऑक्सिजन, बेड, औषधं यांसाठी हातात हात घालून लढत होतो. म्हणून माणुसकी जिंकून आपण त्या संकटाला परतून लावलं. पण आज पुन्हा धार्मिक व जातीय वाद वाढताना दिसत आहे.
कुणाला वाटंत असेल ही माणुसकी विसरली जाईल आणि आपण केलेल्या द्वेषाच्या चिखलात सत्तेचं कमळ फुलेल किंवा काहींना वाटंत असेल आपली राजकीय भाकरी भाजली जाईल. पण महाराष्ट्रात ते शक्य नाही आणि आपली संस्कृतीही तसं होऊ देणार नाही. फक्त मनात सत्तेचे मांडे खाणाऱ्यांनी पेटवलेल्या आगीत सामान्य माणसाच्या भाकरीचा कोळसा होणार नाही आणि द्वेषाच्या चिखलात एकात्मतेचा पाय फसणार नाही याची दक्षता घ्यावी,’ असंही पवार यांनी म्हटलं आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम