राज्यपालांच्या सहीचं बोगस पत्र सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होतंय. राज्यपाल नियुक्ती १२ आमदारांचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. अशात आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सहा आमदारांच्या नावांची शिफारस व्हायरल झाले. पत्राची खातरजमा केल्यानंतर हे पत्र बोगस असल्याचं सांगितले आहे.
29 सप्टेंबर 2020 चं हे बोगस पत्र सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होतंय.या पत्रावर मलबार हील ऐवजी मलबार ‘होल’ असा चुकीचा पत्ता असून या पत्रात राज्यपालांनी सुचवलेली आमदार 6 नावेच होती. सरकारने 12 नावे सुचवण्यापूर्वीची या पत्रावर तारीख आहे. सरकारने 6 डिसेंबरला 2020 ला ही 12 नावे सुचवली होती. या पत्रामुळे आता राजकारणात तिखट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
पत्रातून विधान परिषदेसाठी राज्यपालांकडून ६ नावांची मुख्यमत्र्यांकडे शिफारस करण्यात आली आहे. या बनावट पत्रावर वीरभद्रेश करबसप्पा बसवंती, रमेश कोकाटे, सतीश घरत, संतोष नाथ, मोरेश्वर भोंडवे, जगन्नाथ पाटील अशी सहा नावांची शिफारस करण्यात आली आहे. अद्याप या नावांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंजुरी दिलेली नाही. या पत्रात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची सही आणि राजमुद्रेचा शिक्का असल्याचं दिसतं आहे.त्यामुळे राज्यातून विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम