द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : उत्तर प्रदेशात भाजपला कडवी लढत भेटणार असं चित्र दिसत असताना, रिपाइं नेते रामदास आठवले यांनी मात्र भाजपला उत्तर प्रदेशात हरवणे येड्या गबाळ्याचे काम नाही असे म्हटले आहे.
उत्तर प्रदेशात सध्या निवडणुकीचे वारे वाहते आहे. त्यात सध्या सत्तेत असलेल्या भाजपच्या योगी सरकारला मात्र एकामागे एक अनेक धक्के बसले आहेत. आत्तापर्यंत सत्ताधारी भाजप मधून अनेक महत्वपूर्ण नेते आणि आमदार पक्षाला सोडचिट्ठी देऊन गेले आहेत.
निवडणुकीच्या तोंडावर भाजपला धक्के बसले आहेत. मात्र उत्तर प्रदेशात जे भाजप सोडून गेले आहेत, त्यांनाच त्याचा तोटा होईल. उत्तर प्रदेशात भाजपला हरवणे येड्या गबाळ्याचे काम नाही. उत्तर प्रदेशात भाजप 300 जागा जिंकेल. असे आठवले यांनी म्हटले आहे.
दरम्यान, भाजपचे प्रमुख नेतेच भाजपला सोडचिट्ठी देऊन गेल्याने, भाजपला धक्के बसले. उत्तर प्रदेशातील प्रमुख पक्ष असलेल्या मुलायमसिंह यांच्या समाजवादी पक्षाची वाट या सर्वांनी धरल्याने समाजवादी पक्ष प्रबळ होत असल्याचे वाटत असतांनाच, मुलायमसिंह यांच्या सुनेनेच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे मोठा धक्का समाजवादी पक्षाला बसला आहे.
उत्तर प्रदेशात राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणावर तापते आहे. होत असलेली राजकीय उलथापालथ निवडणुकीनंतर काय चित्र दाखवते हे लवकरच स्पष्ट होईल.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम
,👍