मुंबईतील मशिदी ‘हायअलर्टवर ‘ ; राज ठाकरेंच्या इशाऱ्याने सुरक्षा वाढवली

0
30

मुंबई प्रतिनिधी : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भोंग्यांच्या मुद्यावरून संपूर्ण राज्याचं राजकारण दणाणून सोडलयं , त्यात त्यांच्या संभाजीनगर मधील सभेनंतर राज्यात वातावरण चांगलच तापलेल दिसून येतय . राज ठाकरेंच्या ४ मे पर्यंतच्या अल्टीमेटम नंतर व ” ४ तारखे नंतर मशिदींवरील भोंगे न उतरवल्यास मशिदींसमोर हनुमान चालीसा लावू ”  ह्या वक्तव्या नंतर पोलीस खात आता सज्ज झालं आहे .

मुंबईतील मिनारा मशिदी बाहेर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त लावला आहे . ईदच्या निमित्ताने अनेक मुस्लिम बांधव मशिदींमध्ये प्रार्थने साठी एकत्र येत असतात . आणि एकंदरीतच राज्यात परिस्थिती बघता , कायदा सुव्यवस्था रखण्यासाठी ही सुरक्षा वाढवली गेली आहे. मिनारा मशिदी सोबत इतर मशिदींन बाहेरील सुरक्षाही वाढवण्यात आली आहे . तर पोलीसांबरोबर QRT ( क्वीक रिस्पॉन्स टिम) चे जवान ही तैनात करण्यात आले आहेत . कुठेही कायदा सुव्यवस्थेचे उल्लंघन होऊ नये म्हणून मुंबई पोलीसांना ही विशेष खबरदारी घेतल्याचे पहायला मिळतय . तर कसलाही गोंधळ होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक नोटीस सुध्दा मनसे कार्यकर्त्यांना देण्यात आली आहे . एकुणच  सगळ्याच बाबतीत मुंबई पोलिसांची चोख व्यवस्था पाहायला मिळतेय.

 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here