द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : महाविकास आघाडी सरकार मधील चलबिचल वारंवार चव्हाट्यावर येत आहे. आधी काँग्रेस (Congress) आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) ने निवडणुका लढवण्याबाबत स्वबळाचा नारा दिल्याने, चलबिचल स्पष्ट होऊ लागली आहे.
भाजप (BJP) सोबत संसार मोडून शिवसेनेने (Shivsena) आपला वेगळा मार्ग निवडला. आणि काँग्रेस – राष्ट्रवादी सोबत महाविकास आघाडी स्थापन करून सरकार स्थापन केले.
ज्या काँग्रेस (Congress)आणि राष्ट्रवादीला (NCP) कधीकाळी शिवसेना (Shivsena) कट्टर विरोध करत होती, त्याच काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत शिवसेनेने नवीन संसार थाटला. मात्र हा संसार सुरू झाल्यापासून, नेहमीच कटकटी चालू आहेत असं दिसतंय. महाविकास आघाडी सरकार मध्ये वारंवार काही ना काही वादंग समोर येतच आहेत.
सर्वात आधी तर काँग्रेस ने आपली कुरबुर सुरू करून, महाविकास आघाडी सरकार मध्ये काहीही आलबेल नसल्याचं दाखवून दिलं. त्यामुळे ही महाविकास आघाडी बिघाडी कडे वळतेय का? असा सवाल उपस्थित केला जाऊ लागला होता.
सध्या महाराष्ट्र (Maharashtra) भर स्थानिक निवडणुकांचं वारं वाहू लागलं आहे. आणि त्यात काँग्रेस ने आधीच स्वबळाचा नारा दिला आहे. आणि आता त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने देखील आता स्वबळाचा नारा दिला आहे. स्थानिक निवडणुकांमध्ये सरसकट युती होणे अशक्य आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस ने स्पष्ट म्हटले आहे. त्यामुळे या महाविकास आघाडी सरकारच्याच भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.
काँग्रेस ने स्वबळाचा नारा दिल्यावर शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thakarey) यांनी स्पष्ट नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस च्या या पावित्र्याने शिवसेना काय उत्तर देते, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय.
महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून अंतर्गत नाराजी, मंत्र्यांवर एका मागे एक होत असलेले आरोप, मुख्यमंत्र्यांवर होणारी टीका, भाजप-शिवसेना वाद अशा अनेक कारणांनी या महाविकास आघाडी सरकार बद्दल भवितव्याबाबत हजारो सवाल उपस्थित केले जाऊ लागले. आणि आता अशा प्रकारे काँग्रेस नंतर राष्ट्रवादीने देखील स्वबळाचा नारा दिल्यावर, सरकार कधीपर्यंत तग धरेल, या देखील शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम