महाराजांचा पुतळा हटवला ; वातावरण तापले

0
47

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी (अमरावती) : अमरावती येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याने मोठा तणाव निर्माण झाला आहे.

राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त औचित्य साधून रवी राणा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवला होता. मात्र हा पुतळा विना परवानगी बसवला असल्याचे म्हणत अमरावती प्रशासनाद्वारे रातोरात काढण्यात आला. यामुळे इथले वातावरण मोठ्या प्रमाणावर तापले असल्याने, पोलीस बंदोबस्त कडक करण्यात आला आहे.

रवी राणा आणि नवनीत राणा यांना पोलिसांच्या नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. त्यांच्या घरासमोर पोलीस आणि SRPF चा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here