मस्तवाल ‘कानडी’ सरकारला शिवसेनेचा इशारा ; जनतेची अडवणूक थांबवा अन्यथा उद्या चेकपोस्ट उधळणार

0
207

कोल्हापूर प्रतिनिधी : बेळगाव सीमावर्ती भागात मराठी माणसांवर कानडी सरकार तर्फे नेहमीच अन्याय करण्यात येतो. त्यांची दडपशाही सुरूच आहे. महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या लोकांची अडवणूक थांबवा अन्यथा कर्नाटक सीमेवरील चेकपोस्ट उधळून लावू असा इशारा शिवसेनेने कर्नाटक सरकारला दिला आहे.

कोगनोळी टोल नाका परिसरात RTPCR टेस्ट शिवाय कर्नाटकात प्रवेश नाकारला जातोय. यामुळे अनेक नागरिकांची गैरसोय होत आहे. कानडी सरकारच्या या दडपशाहीला जनता वैतागली असून शिवसेना स्टाईल ने धडा शिकवू असा इशारा शिवसेनेने दिला आहे. कर्नाटक सरकारच्या भूमिकेमुळे गडहिंग्लज चंदगड भागात जाणाऱ्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतोय.

कोल्हापूर जिल्हा शिवसेनेचा कर्नाटक सरकारला उद्या संध्याकाळपर्यंत अल्टिमेटम महाराष्ट्रातील नागरिकांना RTPCR सक्ती केल्यास गुरुवारी चेक पोस्ट उधळण्याचा जिल्हाप्रमुख विजय देवणे यांचा इशारा दिला आहे.

कर्नाटक सरकार , प्रशासन मात्र आपले हुकूमशाही वृत्ती कायम अमलात आणते. सीमावाद नेहमीच वादाचा विषय राहिला आहे. शिवसेनेच्या या आक्रमक पवित्र्यानंतर कानडी प्रशासन काय निर्णय घेते हे बघणे गरजेचं आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here