द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : महाराष्ट्रात राज्य सरकारने सर्व दुकानांच्या पाट्या मराठी असाव्यात असा निर्णय घेतला आहे. मात्र MIM चे औरंगाबाद (संभाजीनगर) येथील खासदार इम्तियाज जलील यांना हा निर्णय पटलेला दिसत नाही.
दुकानदारांकडे खायला पैसे नाहीत, ते पाट्या कसे बदलणार? सरकारचे खरच मराठीवर प्रेम असेल तर सरकारने स्वतः खर्च करून दुकानांच्या पाट्या बदलून द्याव्यात असे खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रात आता सर्व दुकानांच्या पाट्या मराठीतच असाव्यात असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबत महाराष्ट्रातील मराठी जनतेने आनंद व्यक्त केलाय. तर आता दुकानांच्या पाट्या बदलायला प्रारंभ देखील झाला आहे.
मात्र MIM खासदार इम्तियाज जलील यांनी या निर्णयास विरोध दर्शवला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम