द पॉईंट नाऊ ब्युरो : भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना शिवसेना नेते संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे.
नुकतीच 23 जानेवारी रोजी बाळासाहेब ठाकरे यांची जयंती पार पडली. या दिवशी सर्वच पक्षांच्या नेत्यांनी बाळासाहेब यांना आदरांजली वाहिली. मात्र गांधी घराण्यातील कोणीही बाळासाहेब ठाकरेंबाबत ट्विट केले नाही. असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. यावर संजय राऊत यांनी उत्तर दिले.
फडणवीसांना जर एवढेच वाईट वाटले, तर केंद्र सरकारला बाळासाहेबांना एखादा पद्मविभूषण पुरस्कार का द्यावासा वाटला नाही. असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. हल्ली उठसूठ कोणालाही पद्म पुरस्कार दिले जातात. मरणोत्तर पद्म पुरस्कार देण्याची प्रथा थांबायला हवी. असे राऊत यांनी म्हटले आहे.
दरम्यान, केंद्र सरकार द्वारे नुकतीच पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. ज्यात मरणोत्तर पद्म पुरस्कार देखील जाहीर करण्यात आले.
आता राऊत यांच्या या टिप्पणीवर भाजप नेते काय बोलतात, याकडे लक्ष लागले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम