बाबरी पडली तेव्हा कुठे होतात, देवेंद्र फडणवीस यांचा सरकारला टोला

0
14

१ हे महाराष्ट्र दिनानिमित्त माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथील बूस्टर डोस सभा आयोजित केली.या सभेत शिवाजी महाराजांना घेऊन तसेच सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देऊन आपल्या सभेला सुरुवात केली आहे. या प्रसंगी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यावरही टीकास्त्र सोडले.

मुंबईतील सोमय्या ग्राऊंडवर भाजपच्या बुस्टर डोस सभेत फडणवीस बोलत होते. काही लोकांना असे वाटत ते की ते म्हणजेच महाराष्ट्र आहे. कोरोनाच्या काळात महाविकास आघाडी सरकारने बिल्डर आणि बारमालकांचे कल्याण केल्याची टीका फडणवीस यांनी केले. बरेच दिवसापासून हिंदू आणि भोंगया वरील वादामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे यावरच फडणवीसांनी देखील आपली प्रतिक्रिया म्हणून तर मशिदीवरील भोंगे काढायला सांगितले तर ते झालं नाही आणि म्हणतात आम्ही बाबरी पाडली.

हिंदू कधी मशीद पाडूच शकत नाही. तो ढाचा होता ते पाडण्याचं काम आम्ही अभिमानानं केलं. तो ढाचा पाडताना देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी होता. याच राम मंदिरासाठी सेन्ट्रल जेलमध्ये मी १८ दिवस घालवले. आणि तुम्ही आम्हाला विचारता बाबरी पडली तेव्हा तुम्ही कुठे होता? सवाल फडणवीस यांनी सरकारला विचारला आहे.

 

 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here