पक्षाचे लोक कायदा सुव्यवस्था हाती घेत आहे; दरेकरांची सरकारवर टीका

0
54

महाराष्ट्र खळबळजनक वातावरण असून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ आली आहे, अशी मागणी विधानपरिषदेचे नेते प्रवीण दरेकर केले आहे. दरेकरांनी आज २३ एप्रिल भाजप नेत मोहिम कंबोज यांच्यावर शिवसैनिकांनी काल केलेल्या हल्ल्याप्रकरणात पत्रकार परिषद घेण्यात आली होती.

आमदार रवी राणा आणि त्यांची पत्नी खासदार नवनीत राणा दाम्पत आज मातोश्री समोर हनुमान चालिसा पठाण करणार होते, परंतु शिवसैनिकांनी त्यांनी अडकल्यामुळे त्या मातोश्री जाता आले नाही, यावरून ही दरेकरांनी सरकारवर टीका केली. “राज्यात अलीकडच्या काळातील वादग्रस्त वातावरण आहे. यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील संपूर्ण परिस्थिती आज भाजपची बैठक होणार आहे. याबद्दल काय करायचे यासंदर्भात निर्णय घेणार आहे.”

“राज्यात ज्या पक्षाचे सरकार आहे, त्याच पक्षाचे लोक कायदा सुव्यवस्था हाती घेत आहेत. महाविकासआघाडी सरकार हे गुंडगिरी पुरस्कृत सरकार आहे. “मुंबई पोलिसांना निवेदन देणार असून शिवसेनेचे कार्यकर्ते राज्यात दहशतवादी पसरविण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्यात सरकारने याकडे लक्ष घालावे. या प्रकराला लवकरात लवकर आळा घाला, मुख्यमंत्री मुग गिळून गप्पा बसले, असा आरोप दरेकरांनी केला आहे


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here