राज्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे विरुध्द शिवसेना वाद चांगलाच चर्चेत आहे. त्यातच मुंबई महानगरपालिकेने भाजप नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मोठा झटका दिला आहे. महापालिकेने नारायण राणे यांच्या मुंबईतील आठ मजली ‘अधिश’ बंगल्याप्रकरणी अर्ज फेटाळून लावला आहे.
महापालिकेने नारायण राणेंना त्यांच्या जुहू येथील अनाधिकृत अधिश बंगल्यात बांधकाम प्रकरणी नोटीस बजावली होती. त्यानंतर महापालिकेच्या पथकाने अधिश बंगल्यावर छापा असता अनाधिकृत बांधकाम महापालिकेच्या लक्षात आलं.
हे अनाधिकृत बांधकाम अनधिकृतरित्या केलेले बांधकाम नियमीत करण्याबाबत मुंबई महापालिकेकडे अर्ज केला होता. मात्र महापालिकेने अर्ज फेटाळून लावून नारायण राणेंना जोरदार दणका दिला आहे. महापालिकेने 15 कारणं देत हे बांधकाम नियमीत करणे शक्य नाही असे सांगितलं आहे.
महापालिकेकडून नारायण राणेंना 15 दिवसांची मुदत दिली आहे. राणेंनी स्वत:हून हे अनाधिकृत बांधकाम १५ दिवसात पाडलं नाही तर महापालिकेकडून हे बांधकाम पाडण्यात येईल आणि खर्च वसूल केला जाईल, महानगर पालिकेने आशी नोटीस देऊन नारायण राणेंना मोठा झटका दिला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम