जिल्हा परिषद , पंचायत समिती आरक्षण डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात

1
52

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; राज्यातील ‘मिनी विधानसभा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्रामीण भागातील जीवनदायिनी जिल्हा परिषद ,पंचायत समिती निवडणुक 2022 गट व गण रचना, आरक्षण सोडत ही डिंसेबरच्या पहिल्या आठवड्यात होणार असल्याची खात्रीलायक सूत्रांनी माहिती ‘द पॉईंट नाऊ’ ला दिली आहे.

तर आचार सहिंता ही 15 जानेवारीच्या दरम्यान राज्यात लागू होणार आहे.

ग्रामीण भागातील आखाड्यात अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. राज्याच्या राजकारणात बदल घडवण्याची ताकद जिल्हा परिषद राजकारणात आहे. कामाची कसोटी गेल्या पाच वर्षात केलेलं काम याच्या आधारावर या निवडणुका होत असतात.

आरक्षण सोडत झाल्यानंतर खऱ्या अर्थाने लढती स्पष्ट होतील. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने ही आघाडी ग्रामीण भागात होणं कदापि शक्य नसल्याने, जवळजवळ सर्वच पक्ष स्वबळावर लढणार असल्याने राज्यात नंबर एक कोण याचा कस खऱ्या अर्थाने लागणार आहे.

राज्यातील काही जिल्ह्यात स्थानिक आघाडी किंवा पक्षीय बलाबल बघून निर्णय घेतले जातात. अनेक ठिकाणी युती आघाडी सोयीनुसार होणार असतात. येत्या निवडणुका ह्या विकासाच्या मुद्द्यावर लढवल्या जाता की जातीय धुर्विकरण होत हे बघणे महत्त्वाचे आहे.

राज्यात आघाडीचे सरकार तर केंद्रात भाजपचे सरकार यामुळे राजकीय चिखलफेक जोमात होणार यात शंका नाही.

 

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here