‘चलेजाव’ सारखा वणवा पेटला असता, भाजपाने वेळीच ओळखलं हे नशीब

0
46

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; सेना भाजपा वार पलटवार सुरूच आहेत, शिवसेनेचे फायरब्रॅंड नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) नाशिक दौऱ्यावर आहेत. सकाळी शिवसेना नगरसेवक डी. जी. सुर्यवंशी यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन संजय राऊत यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी राऊतांनी तुफान फटकेबाजी करत भाजपाला धारेवर धरले.

खा. राऊत म्हणाले नाशिक महानगरपालिकेत शिवसेनेचे १०० नगरसेवक निवडून येतील. यात शंका नाही. भाजपावर टीका करतांना म्हणाले दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्र स्वतंत्र झाला, या शब्दांत राऊत यांनी हल्लाबोल केला.

बोलतांना राऊत म्हणाले जसे १९४७ मध्ये ‘चलेजाव’ची चळवळ सुरू झाली, म्हणून ब्रिटिश सरकार पळाले. तसेच जनता आता रस्त्यावर आली असती. कोण पंतप्रधान, कोण गृहमंत्री आहे हे जनतेने पाहिले नसते. अराजकता माजली असती याचा अंदाज केंद्राला आला म्हणूनच हे कायदे मागे घेतल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. आम्ही करेक्ट कार्यक्रम करत महाराष्ट्राला दोन वर्षापूर्वी स्वतंत्र करत भगवा फडकवला, अस टोला देखील संजय राऊत यांनी लगावला आहे.

संजय राऊत चंद्रकांत पाटलांवर चांगलेच भनकले पाटलांच्या कृषी कायदे मागे घेतल्यानंतरच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले, चंद्रकांत पाटील यांना दुःख वाटत असेल, तर त्यांना शोक संदेश पाठवू शोकसभा आयोजित करू असे म्हणून पाटलांना चांगलेच डिवचले.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here