मशिदीवरील भोंगे उतरविण्याचा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. हिंदुत्वाच्या वादावरून राजकीय वातावरण तापलेले आहे. राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेबाबत बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, सभा घेणं हा राज ठाकरे यांचा छंद आहे, खडतर शब्दात टीका केली आहे.
“राज ठाकरे यांना सभा घेण्याचा छंद आहे, मात्र त्यांना यश मिळत नाही,अभ्यास करून परीक्षेत चांगले गुण पडले तर त्या अभ्यासला अर्थ आहे, सभा घेणं हा राज ठाकरे यांचा छंद आहे,मात्र त्या सभेचा त्यांना कोणताही फायदा होत नाही, ते केवळ एजंट म्हणून काम करतात,” असा टोला शिवसेना नेते राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे.
अनेक सभा घेऊनही निवडणुकीत त्यांचे गुणपत्रक कोरेच असते, त्यांच्याकडे एकही पालिका नाही,त्यांचा केवळ एक आमदार आहे. त्यामुळे त्यांच्या सभेने काहीही फरक पडणार नाही. त्यांचे अकाऊंट कोरेच आहे बिना पैशाचे अकाउंट दाखविण्यात काहीही अर्थ नाही,जनतेने त्यांना यश दिले पाहिजे,” पहिली भूमिका काय? पक्ष स्थापनेची भूमिका काय ? झेंड्याची भूमिका काय ? आता तर झेंड्यात इंजन घुसले आहे. स्वतःच्या पक्षाची भूमिका बद्दलवितो त्या माणसाला यश मिळत नाही,ते मिळविण्यासाठी त्यांचा हा खटाटोप सुरू आहे,” असा हल्लाबोल गुलाबराव पाटलांनी केला.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम