कारवाई नंतर संजय राऊत म्हणतात ; ‘असत्यमेव जयते..!’

0
30

मुंबई प्रतिनिधी : शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणात ईडीने संजय राऊत यांची कोट्यवधींची मालमत्ता जप्त केली आहे. पीएमएलएच्या चौकशीत ईडीने अलिबागचे आठ भूखंड आणि मुंबईतील फ्लॅट्स राऊत यांच्या मालकीचे आहेत. हा घोटाळा 1034 कोटींचा असल्याचे सांगण्यात येत आहे.

अंमलबजावणी संचालनालयाच्या या कारवाईनंतर संजय राऊत यांनी एक ट्विट केले आहे. त्यांनी ट्विटरवर लिहिले, ‘असत्यमेव जयते!!’

मिळालेल्या माहितीनुसार, 1034 कोटींच्या पत्रा चाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीने अटक केलेल्या संजय राऊतच्या जवळच्या प्रवीण राऊतचे नाव आहे. या प्रकरणी ईडीने आरोपपत्रही दाखल केले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here