ओबीसींचं आरक्षण गेलं हे राज्यकर्त्यांचे अपयश – फडणवीस

1
53

द पॉईंट प्रतिनिधी ; राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुन्हा राज्य सरकारवर टीका केली आहे. शरद पवार यांनी केंद्रावर खापर फोडलेले नाही पवारांना माहीत आहे की देशात सगळीकडे ओबीसी आरक्षण सुरु आहे, केवळ आपल्या राज्यात ओबीसींचं राजकिय आरक्षण गेले आहे. हा राज्यसरकरचा नाकर्तेपणा आहे.अजूनही तो सुरूच आहे.

फडणवीस म्हणाले की राज्यसरकारला आरक्षण द्यायचं नाही, जोपर्यंत महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुका आहेत तोपर्यंत चालढकल करायची आहे, राज्य मागासवर्गीय आयोगाने सांगितलं की आम्हाला पैसे द्या आम्हाला इम्पिरीकल डाटा द्या पण ते करायचं सोडून राज्य सरकार केंद्रावर ढकलत आहे. हे लक्षण वेगळे असून राज्याला ओबीसी समाजाला आरक्षण द्यायचे नाही.

इच्छा शक्ती असली तर सर्व शक्य आहे. मराठा आरक्षणाबाबत आम्ही 4 महिन्यात इम्पिरीकल डेटा दिला होता. त्यामुळे मनात असेल तर होऊ शकेल, पण सरकारच्या मनात नाही, ओबीसींना फसवण्याचे काम या सरकारचे चालू आहे. केंद्र सरकारची जनगणनेला परवानगी नाही असं कोणी सांगत असेल तर यापेक्षा मोठी दिशाभूल नाही.

राज्य सरकार अफवा पसरत आहे. एमपीरिकल डेटा जमा करण्यासंदर्भात केंद्राची कोणतीही परवानगी लागत नाही. मराठा आरक्षणासंदर्भात एमपीरिकल डेटा तयार केला तेव्हा आम्ही कोणाची परवानगी घेतली होती, 100 टक्के हा राज्याचा विषय आहे. सर्वोच्च न्यायालयाने थेट राज्य सरकारला सांगितले आहे, केंद्राला नाही त्यामुळे ही राज्याची च जबाबदारी आहे. मात्र राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here